
‘गोष्टी विचारवंतांच्या’ आणि ‘गप्पा आजोबांशी’ या प्रसिद्ध पुस्तकाचे लेखक कै. श्री बाळकृष्ण शुक्ल यांच्या स्मरणार्थ किशोर मुलांच्या वयोगटासाठी आयोजित करण्यात आलेल्या ‘कथा स्पर्धा २०२५’ या कथा स्पर्धेत यंदा ७५ लेखकांनी सहभाग घेतला. आलेल्या गोष्टींचे प्राथमिक परीक्षण कांचन जोशी यांनी करून त्यातील २५ गोष्टी बाजूला काढल्या गेल्या. पुढील परीक्षणाचे काम राजीव तांबे आणि शुभदा चौकर यांनी केले. यंदाच्या स्पर्धकांमध्ये शालेय विद्यार्थ्यांपासून ते पंचाहत्तरी ओलांडलेल्या ज्येष्ठ नागरिकांपर्यंत अशी वयोगटाची रेंज होती. नीतिकथा, मूल्यकथा, रहस्यमय कथा, गूढकथा, विज्ञान कथाही आपल्याकडे आल्या. विद्यार्थी, गृहिणी, शासकीय कर्मचारी, शिक्षक, इंजिनीयर, डबिंग आर्टिस्ट, स्टँड अप कॉमेडियन अशा वेगवेगळया व्यवसायात असलेल्या करणाऱ्या सर्वांनी कुमार-किशोरांसाठी गोष्टी लिहिल्या होत्या. प्रत्येकाचे भावविश्व आणि अनुभवविश्व वेगळे असल्यामुळे गोष्टींमध्ये वैविध्य होते.
कुमार-किशोरांच्या कथा स्पर्धेला इतका चांगला प्रतिसाद मिळणे ही गोष्ट किशोर-साहित्य निर्मितीच्या दृष्टीने खूपच आनंददायी आहे. आपण आश्रमशाळेच्या शिक्षकांनाही बक्षिसे देणार होतो. पण त्या गटात स्वतंत्र एन्ट्री आलेल्या नाहीत. आता लवकरच आपण उत्तम ५ आणि उत्तेजनार्थ ५ अशा १० विजेत्यांची निवड जाहीर करू आणि त्यांना बक्षिसे पाठवू. स्पर्धेच्या आयोजनाचे सर्व काम आपले सहकारी क्रांती गोडबोले, पल्लवी पांढुर्णेकर आणि विजया घडशी यांनी आस्थेने केले. अधिकारी सरांच्या कल्पनेतून आणि पाठबळामुळे ही स्पर्धा आपण घेतली. त्यांचे मनःपूर्वक आभार.
कथा स्पर्धेतील विजेते-
सखी- डॉ. मोनाली हर्षे कोथरूड, पुणे
नाक- साारिका चौधरी, वांद्रे (पू), मुंबई
मला धावपटू व्हायचंय- भाग्यश्री कारभारी शिंदे, धुळे
संस्कारांना फुटले अंकूर- संजय सागडे, ता. बारामती जि. पुणे
जीव झाडाले टांगला- सविता कारंजकर, सातारा
कथा स्पर्धेतील उत्तेजनार्थ-
नितीनची नितीमत्ता- सागर राजीव वानखेडे, नाशिक
एका दगडात दोन पक्षी - प्रा. डॉ. नंदा संतोष हरम, औंध पुणे
निश्चयी यश- राधेश्याम तिबंक भालेराव, अहमदनगर
मी विजेता- डॉ. अविनाश विनायक भोंडवे, पुणे
खारुताई आणि शौर्य- सावित्री जगदाळे, सातारा
***