Menu

कथालेखन स्पर्धा

image 31
Mar

✒️???? गोष्ट लिहिणाऱ्यांना आवाहन✒️

तुम्हांला मुलांसाठी गोष्टी लिहायला आवडतात का?
‘गोष्टी विचारवंतांच्या’ आणि ‘गप्पा आजोबांशी’ या प्रसिद्ध पुस्तकांचे लेखक कै. बाळकृष्ण लक्ष्मण शुक्ल यांचा स्मृतीदिन १४ फेब्रुवारीला आहे. त्यांच्या स्मरणार्थ कथालेखन स्पर्धा आयोजित करण्यात येत आहे. यामध्ये कुमार-किशोर मुलांच्या वयोगटासाठी (वय ८ ते १६) कथा लिहिणे अपेक्षित आहे. ही मराठी कथास्पर्धा ''वयम्'' मासिक, शुक्ल परिवार व अल्पारंभ  फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात येत आहे.

???? कथालेखन स्पर्धेचे नियम आणि अटी-

✅️ कथा मराठीत असावी.

✅️ कथालेखक कोणत्याही वयाचा असावा.

✅️ कथा ८ ते १६ वयोगटासाठी असावी.

✅️ कथा स्वतंत्र असावी आणि पूर्वप्रकाशित नसावी. (फेसबुक,  
ब्लॉग इत्यादी कोणत्याही समाजमाध्यमांवर देखील प्रकाशित झालेली नसावी.)

✅️ कथेची शब्दमर्यादा ६०० ते ९०० शब्द असावी.

✅️ कथा टंकित (टाइप) करून pdf आणि word स्वरूपात ahamawamwayam@gmail.com यावर पाठवावी किंवा कागदाच्या एका बाजूवर लिहून संपादकीय विभाग-  ''वयम्'', न्यू वंदना को.ऑप.हा.सो., ३रा मजला, लालबहादूर शास्त्री मार्ग, वंदना सिनेमाजवळ, ठाणे- ४००६०२ या पत्त्यावर पाठवावी. दूरध्वनी : ०२२-२५९८६२७०.

✅️ कथेचा प्रकार (विनोदी, चातुर्य कथा, विज्ञान कथा इत्यादी) कोणताही असला तरी चालेल.

✅️ स्पर्धेसाठी कोणतीही प्रवेश फी नाही.

✅️ कथेबरोबर लेखकांनी स्वतःची थोडक्यात माहिती पाठवावी. (नाव, पूर्ण पत्ता, व्यवसाय, फोन नंबर, इमेल)

✅️ कथा पाठवायची अंतिम तारीख- ३१ मार्च २०२३

✅️ पहिल्या पाच उत्तम कथांना रु. २०००/- चे रोख रकमेचे पुरस्कार आणि रु. १०००/- चे
रोख रकमेचे पाच उत्तेजनार्थ पुरस्कार देण्यात येतील.

✅ काही मान्यवर लेखक या स्पर्धेचे परीक्षण करणार आहेत. त्यांचा निर्णय अंतिम राहील.

तुमच्या गोष्टींची आम्ही वाट पाहतोय!

My Cart
Empty Cart

Loading...