
पुढे पुढे सरकणारी मकर संक्रांत
On 14th January 2021, Children Magazine
गणितज्ज्ञ रामानुजन यांची आज जयंती आहे. यशाची बीजं बरेचदा बालपणातच दिसतात. रामानुजन शाळेत असतानाची गोष्ट! एके दिवशी शाळेतल्या गणिताच्या शिक्षकांना शिकवण्याचा अतिशय कंटाळा आला होता. विद्यार्थ्यांना अत्यंत अवघड काम द्यावं आणि आपण आराम करावा असा विचार त्यांनी केला. १ ते १०० पर्यंतच्या आकड्यांच्या बेरजा मुलांना करायला लावून हे महाशय स्वस्थ बसले होते . पण त्या दिवशी आराम त्यांच्या नशिबातच नसावा! काही मिनिटांतच एक विद्यार्थी गुरुजींच्या जवळ येऊन म्हणाला, “गुरुजी, झालं माझं!” आता आश्चर्यचकित व्हायची वेळ गुरुजींची होती.
कोकणातल्या एका छोट्याशा गावात राहणारी पिंटी आणि तिचे दोन भाऊ यांच्या बालपणीच्या काळातल्या, म्हणजे १९८० च्या दशकातील मजेदार अनुभव-कथा सांगणारे डॉ. निधी पटवर्धन यांचे 'पिंटी’ हे नवे पुस्तक जरूर वाचावे, असे आहे. वाचा यातील एक कथा'
आजी प्लास्टिकच्या जाड कागदावराच्या चिकोड्या सोडवत होती. मी पण तिला मदत करत होते. चिकवड्या सुकल्या की आपोआपच सुटत. न सुटणारी एखादी जाड चिकवडी पाठून ओलसर राहिलेली असे, ती मी गट्टम करत होते. आजी ओरडत होती, ‘पुरे झाली मदत.’ मी पुन्हा दोन चिकवड्या घेऊन पळ काढला. रुप्याला एक दिली.
परीच्या जगातील एक परीकथा....
एक होती परी. तिचं नाव जरू. जरूचा एक मित्र होता, त्याचं नाव हिमान. जरू जशी परी होती तसा हिमान परा होता. त्यांची गंतच चालायची. दोघं आपल्या रंगीबेरंगी पंखांनी उड उड उडायचे. खेळायचे. वेगवेगळ्या आकाराच्या ढगांना शिवायचे. त्यांच्यावर बसायचे. त्यांच्याशी स्पर्धा सुद्धा खेळायचे. पाऊस भरलेल्या ढगांध्ये गेल्यावर मज्जा यायची. त्यातलं पाणी जमिनीवर पडायच्या आता जरू आणि हिमान त्यात खेळायचे. सकाळ होत आली, फुलं उमलली की दोघं आपल्या
निरागस अलफाज आणि त्याचे प्रेमळ व समजूतदार अम्मी-अब्बू यांची ही तरल गोष्ट- शाळा सुटली आणि अलफाज घरी आला. दप्तर ठेवलं आणि हात पाय धुऊन खेळायला पळाला. आज मॅच ठरली होती गावातल्या पोरांशी... आज त्यांना हरवायचंच, असं सगळ्या गॅंगने ठरवलं होतं. अलफाज बेस्ट बॅटसमन होता... हमखास मॅच जिंकून देणारा. तो घाईतच गेला. जाता जाता त्याला अब्बू येताना दिसले. ते पार थकून गेलेले भासत होते. आज जास्त टपाल असणार. अलफाजचे अब्बू पोस्टमन होते. त्यांना पत्र वाटण्यासाठी तीन-चार गावात फिरावं लागे. अलफाजने अब्बुना ‘खेळायला जातो’ असं सांगितलं आणि तो पळाला.
खरं तर पालक मुलांना घडवतात पण कधी कधी ही लहान मुलंही आपल्याला नकळतपणे बरंच काही शिकवून जातात....
“आदू, आईला त्रास देऊ नकोस. आई आता अजिबात तुला उचलून घेणार नाही. जरा आईची काळजी तू पण घेत जा आता. दादा होणारेस ना,” बाबा आदूला समजावत होता. आई दुसऱ्या बाळाला घेऊन येणार हे कळल्यापासून त्याला त्यासाठी तयार करायचे आदूच्या आईबाबांचे प्रयत्न सुरू होते.
“पण म्हणजे आई आता मला कध्धीच उचलून घेणार नाही का रे बाबा.. आता फक्त बाळालाच घेणार ती? “ आदूला अजूनही नेमका अंदाज येत नव्हता की, मग आपण आईचे लाडके असणार की नाही ?
हिरव्या सुंदर वनराईची काळजी न घेणाऱ्या माणसाच्या जगातला उलटा चष्मा प्राण्यांच्या जगात पोहोचला. हुप्प हुप्प करीत धमाल करणाऱ्या मुंगेरीची ही गोष्ट. हसवेल आणि विचारही करायला लावेल-
सगळ्या नातवंडात मुंगेरी अगदी द्वाड ! आजी-आजोबा मेटाकुटीला येत मुंगेरीला समजावता समजावता. मुंगेरीचे आई-बाबा लेकरांसाठी आणि त्यांच्या आजी-आजोबांसाठी कुठे फळं मिळतात का ते बघायला कोवळ्या उन्हाचं बोट धरूनच बाहेर पडत नि नाना-नानींवर मुंगेरी व चंदेरीला सांभाळण्याची जबाबदारी येऊन पडे. चंदेरी ही अक्षरशः गुणी मुलगी होती. सक्काळीच आई-बाबांनी शिकवलेल्या नव्या धड्याचा ती सराव करीत असे. छोट्या फांदीवर तोल सावरून कसं बसायचं, एका फांदीवरून दुस-या फांदीवर झुपकन् उडी कशी मारायची, जाळीतून कोवळी करवंद काढताना हाताला काटा कसा लागू द्यायचा नाही; माणसांनी टाकलेल्या पुडीतल्या शेंगदाण्याऐंवजी –नव्यानं येणा-या कैरीचा आंबटपणा कसा गोड मानायचा असा सगळा सराव नाना-नानींच्या देखरेखीखाली छान करायची.
रक्षाबंधनाच्या निमित्ताने ‘वयम्’ मासिकाने घरातील गोष्टींपासून राख्या कशा बनवता येऊ शकतील, याच्या काही कलाकृती उदाहरणादाखल पाठवल्या होत्या. मुलांनी स्वतः घरच्या घरी बनवलेल्या राख्यांचे फोटो आणि दोन ओळीत कृती लिहून ‘वयम्’कडे पाठवण्याचे आवाहनही केले होते. या आवाहनाला मुलांनी छान प्रतिसाद दिला. आपल्या काही वाचक मुलांनी घरातील साहित्यापासून कितीतरी कल्पक राख्या बनवल्या. बघा, कल्पक वयम् वाचकांच्या या राख्या!
रक्षाबंधनाच्या निमित्ताने ‘वयम्’ मासिकाने घरातील गोष्टींपासून राख्या कशा बनवता येऊ शकतील, याच्या काही कलाकृती उदाहरणादाखल पाठवल्या होत्या. मुलांनी स्वतः घरच्या घरी बनवलेल्या राख्यांचे फोटो आणि दोन ओळीत कृती लिहून ‘वयम्’कडे पाठवण्याचे आवाहनही केले होते. या आवाहनाला मुलांनी छान प्रतिसाद दिला. आपल्या काही वाचक मुलांनी घरातील साहित्यापासून कितीतरी कल्पक राख्या बनवल्या. बघा, कल्पक वयम् वाचकांच्या या राख्या!
Ganapati, our beloved deity, is known by the different names and forms. Let’s try to explore more about it..
Friends, Ganesh Chaturthi festival is just round the corner. Lord Ganesha is one “form” of God who is not just worshipped but is loved all-over. Throughout the year, we await His arrival in our homes. So, on this auspicious occasion, let us explore the different names and forms of our beloved deity.
१५ ऑगस्टला झेंडावंदन करताना आपण आपली प्रतिज्ञा म्हणतो. ही प्रतिज्ञा कोणी लिहिली, माहितीये? वाचा, वयम् मासिकात २०१८ मध्ये प्रसिद्ध झालेला हा लेख, आज पुन्हा!
देशभरातील शालेय पाठ्यपुस्तकांमध्ये सुरुवातीलाच 'प्रतिज्ञा’ असते. आपण रोज ती म्हणतो. ही प्रतिज्ञा कोणी लिहिली? कधी लिहिली? ती केव्हापासून देशातील पाठ्यपुस्तकांमध्ये आली? या लेखकाने संशोधन करून ही माहिती मिळवली. वाचा तर, कोण आहेत आपल्या प्रतिज्ञेचे जनक!
पाऊस पडला की अगदी आठवड्याभरातच आपल्या आजूबाजूचं चित्र हिरवंगार होतं. कवी ना. धों. महानोरांच्या भाषेत सांगायचं तर ‘आषाढाला पाणकळा, सृष्टी लावण्याचा मळा!’ मग हे सृष्टी लावण्य खुलतं कसं? हे समजून घेऊया जिल्पा निजसुरे यांच्या लेखातून!'वयम्' मासिकाच्या जून 2013 च्या अंकात प्रसिद्ध झालेला हा लेख वाचा आणि तुम्ही काय काय नवीन पाहिलंत ते जरूर कळवा-
दि.१८ ते २६ जुलै हा आठवडा भारतात National Moth week म्हणून साजरा होत आहे. फुलपाखरांचे चुलतभाऊ म्हणता येतील अशा पतंगांच्या जगाची आम्हांला ( मी आणि युवराज गुर्जर Yuwaraj Gurjar) ओळख झाली, ती येऊरला अचानक दिसलेल्या अॅटलास मॉथ मुळे. डॉ. अरूण जोशी आणि आयझॅक किहीमकर Isaac Kehimkar हे आमचे सुरुवातीचे मार्गदर्शक. जानेवारी २०१५ मध्ये 'वयम्' मासिकासाठी संपादिका शुभदा चौकर यांनी मला संक्रांत विशेषांकात 'पतंगां'वर लेख लिहायला सांगितला, तो लेख म्हणजे- ‘रात्री उडणारे पतंग’. ‘राष्ट्रीय 'पतंग' महोत्सव २०२०’च्या निमित्ताने पुन्हा एकदा वाचकांसाठी आम्ही शेअर करतोय
गंध आणि आठवणी याचं एक छान नातं आहे. हा गंध बसल्याजागी आपल्याला स्थळ-काळ कोणत्याही मर्यादेशिवाय कुठेही घेऊन जातो. आठवा बघू तुम्हाला जुन्या आठवणी करून देणारे वेगवेगळे गंध! एक गंध तर सगळ्या मुला-माणसांना धुंद करतो तो म्हणजे पहिल्या पावसानंतर पसरणारा मातीचा गंध... त्याबद्दल जाणून घेण्यासाठी वाचू या पद्मश्री पुरस्कारप्राप्त वैज्ञानिक डॉ. शरद काळे यांचा लेख! ‘वयम्’ मासिकाच्या जून 2013 च्या अंकात प्रसिद्ध झालेला हा लेख आज या नव्या माध्यमात प्रसिद्ध करत आहोत.
पहिल्या पावसात भिजताना मातीचा सुवास अनुभवलाय तुम्ही? त्याला म्हणतात मृद्गंध. मृदा म्हणजे माती. मातीच्या हा गंध छान खमंग असतो.
गेले काही दिवस पावसाने जवळपास पूर्ण महाराष्ट्रात हजेरी लावून सगळं वातावरण गारेगार केलंय. पण पाऊस नक्की पडतो तरी कसा? आपल्याला सांगतोय थेंबू! हो हो थेंबू ! थेंबूची ही छानशी गोष्ट. या थेंबूला आपल्यासाठी बोलका केलाय ज्येष्ठ वैज्ञानिक डॉ. बाळ फोंडके यांनी! ‘वयम्’ मासिकाच्या जून 2013 च्या अंकात प्रसिद्ध झालेला हा लेख खास बाल-किशोरांना वाचायला पाठवत आहोत.
मित्रांनो, मी आलोSSS
मी... पावसाचा थेंब!
काय, नवीन पाठ्यपुस्तकं पाहिलीत का? शैक्षणिक वर्ष सुरू झालं की पाठ्यपुस्तकं पाहायची ओढ लागते ना? यंदा तर अजून शाळा सुरू नाही झाल्या, पण पाठ्यपुस्तकं मात्र वेळेत आली. पाठ्यपुस्तक या प्रकारचा शोध कधी, कुणी लावला, पहिलं पाठ्यपुस्तक कधी प्रसिद्ध झालं, माहितीये?... 'वयम्' मासिकाच्या जुलै 2014 अंकात प्रसिद्ध झालेला ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ किशोर दरक यांचा हा लेख आज मुद्दाम तुम्हाला वाचायला देत आहोत.
'नव्या कोऱ्या पुस्तकांचा वास मला खूप आवडायचा' हे वाक्य तुम्ही अनेकदा वाचलं/ऐकलं असेल. आत्ता प्रौढ असणाऱ्या अनेकांसाठी 'नवं पुस्तक' म्हणजे 'पाठ्यपुस्तक'च असायचं. कारण बाकी इतर कोणती पुस्तकं हातात पडायचीच नाहीत. शाळेत जाऊन साक्षर झालेल्या सगळ्यांच्या आयुष्यात सर्वाधिक महत्वाचं स्थान असलेली पुस्तकं म्हणजे पाठ्यपुस्तकं!
यंदा करोनाच्या काळात सर्वत्र ताळेबंदी असूनही SSC बोर्डाची पाठ्यपुस्तके वेळेत तयार झाली. ती वेबसाइटवर आली. काही मुलांच्या हातातही आली. पाठ्यपुस्तक हे शालेय अभ्यास शिकण्याचं महत्त्वाचं माध्यम! पाठ्यपुस्तकं कोण, कशी तयार करतं? जाणून घेऊया? ‘वयम्’ मासिकाच्या जुलै 2014च्या अंकातला लेख आहे हा! ‘पाठ्यपुस्तक कसे घडते!'
“स्थायू, द्रव आणि वायू अशा पदार्थाच्या तीन अवस्था आहेत. पेटलेली मेणबत्ती स्थायू अवस्थेत असते, तिच्यापासून ओघळणारे मेण द्रव अवस्थेत, तर ज्योतीतील जळणारे मेण वायू अवस्थेत असते…’
पाठ घेण्यापेक्षा पाठबळ द्या !
सध्या मुलांच्या शाळा निदान ऑनलाइन पद्धतीने सुरू व्हाव्या, असा अट्टहासी सूर आळवला जात आहे. करोना-काळात जणू मुलांचे शिक्षण थबकले आहे आणि शिक्षण-विरहित पोकळीत ती जगत आहेत, अशी चिंता काहींना वाटत आहे. खरोखरच अशी स्थिती आहे का? प्रत्यक्ष शाळा बंद असली तरी मुलांचे शिकणे बंद पडले आहे का? या काळात अनेक मुलांनी नव्या क्षमता कमावल्या, नवी कौशल्ये आत्मसात केली, त्यांना नव्या जाणिवा झाल्या- ही शक्यता आपण लक्षात का घेत नाही?
येनकेन प्रकारे शिक्षकांनी पाठ्यपुस्तकातील पाठ मुलांसमोर सादर केले तरच शिक्षण होते, या गृहीतकापलीकडे आपण शिक्षणाचा विचार केला तर नव्या शक्यता लक्षात येऊ शकतात. अगदी पाठ्यपुस्तक या महत्त्वाच्या व मूलभूत शिक्षण-साधनाला प्रमाण मानूनही मुलांना शिकण्यासाठी चालना देण्याच्या अनेक नव्या शक्यता आपण या काळात आजमावू शकतो.
तीव्र संवेदनशीलता
नवनवीन पदार्थ खायला कुणाला आवडत नाही? मुलांना तर वेगवेगळं, चटकदार खायला हवच असतं ना! मात्र सध्याच्या परिस्थितीत आपण गरजा आणि चैन यांतील फरक समजून घेतला पाहिजे, याची जाणीव या मुलांनाही लख्खकन् झाली! मुलांची संवेदनशीलता किती तीव्र आहे बघा!! ‘वयम्’ मासिकातर्फे आम्ही हाती घेतलेल्या अनुभव-लेखन उपक्रमात शेकडो मुलं लिहिती झाली. त्यातील निवडक अनुभव-लेख आम्ही संपादित रूपात प्रसिद्ध करत आहोत. बघा या मुलांनी करोना-काळात कित्ती गोष्टी करून पाहिल्या...
आज वाचा भाग- 16.
संयमाची रुजवण
मुलांना पाहिजे तेव्हा पाहिजे ते मिळण्याची सवय बहुतांश घरांतून लागलेली असते. लॉकडाउनमुळे त्यांना जाणीव झाली की, आपल्याला जे जे हवेसे वाटतेय ते आत्ता मिळू शकणार नाही. आहे त्यात समाधान मिळवावे लागेल. कौतुक हे, की मुलांनी हाही धडा आनंदाने आत्मसात केला या काळात... ‘वयम्’ मासिकातर्फे आम्ही हाती घेतलेल्या अनुभव-लेखन उपक्रमात शेकडो मुले लिहिती झाली. त्यांतील निवडक अनुभव-लेख आम्ही संपादित रूपात प्रसिद्ध करत आहोत. बघा या मुलांनी करोना-काळात कित्ती गोष्टी करून पाहिल्या...
आज वाचा भाग- 15.
शिस्तशीर मुलांना सलाम!
“आजच्या पिढीला शिस्त नाही,” असा आरोप मोठी माणसं अनेकदा करतात. हा आरोप सपशेल खोटा पाडलेली अनेक मुलं भेटली आम्हांला... अर्थात त्यांच्या पत्रांतून! ‘वयम्’ मासिकातर्फे आम्ही हाती घेतलेल्या अनुभव-लेखन उपक्रमात शेकडो मुलं लिहिती झाली. त्यातील निवडक अनुभव-लेख आम्ही संपादित रूपात प्रसिद्ध करत आहोत. बघा, या मुलांनी गेल्या दोन महिन्यांत किती गोष्टी करून पाहिल्या... त्याही अगदी शिस्तीत! कोण म्हणू धजेल की आजची मुलं बेशिस्त आहेत?
आज वाचा भाग- 14.
बेगमीचा काळ !
करोना सुट्टीच्या काळात बच्चे कंपनी पापड, शेवया असे बेगमीचे पदार्थही बनवू लागली. मुळात बेगमी म्हणजे काय, ती का करायची, हे या काळाने शिकवले त्यांना! आणि घरच्यांशी मनसोक्त गप्पा मारण्यातून त्यांना कितीतरी नव्या जाणिवा झाल्या... हीही बेगमीच, त्यांना पुढच्या आयुष्यात पुरेल अशी!!
…‘वयम्’ मासिकातर्फे आम्ही हाती घेतलेल्या अनुभव-लेखन उपक्रमात एव्हाना शेकडो मुले लिहिती झाली. त्यातील निवडक अनुभव-लेख आम्ही संपादित रूपात प्रसिद्ध करत आहोत.
आज वाचा भाग- 13.
घरोघरी छोटे शेफ!
स्वयंपाकघर ही एक महत्त्वाची प्रयोगशाळा. पण व्यग्रतेमुळे मुलांना या घरच्या शाळेत वावरायला वेळही नसतो आणि वावही नसतो. अचानक मिळालेल्या सुट्टीमुळे मुलांचे पाय स्वयंपाकघरात खेचले गेले. लुडबूड करता करता ही मुले किचन चॅम्पियन झाली की! ‘वयम्’ मासिकातर्फे आम्ही हाती घेतलेल्या अनुभव-लेखन उपक्रमात जी शेकडो मुले लिहिती झाली, त्यांतील अनेकांनी त्यांच्या ‘शेफ’गिरीबद्दल लिहिलंय!
आज वाचा भाग- 12.
एरव्ही दुर्मीळ असलेला वेळ मिळाल्यावर मुलं बारीक निरीक्षण करतात. अनोखे अनुभव मनापासून उपभोगतात... ‘वयम्’ मासिकातर्फे आम्ही हाती घेतलेल्या अनुभव-लेखन उपक्रमात शेकडो मुलं लिहिती झाली. त्यांतील निवडक अनुभव-लेख आम्ही संपादित रूपात प्रसिद्ध करत आहोत. आज वाचा भाग- 11.
बुध व शुक्राचे सुरम्य दर्शन
श्री. हेमंत मोने
शुक्रवार दि. 22 मे 20 रोजी सायंकाळी पश्चिमेकडे बुध आणि शुक्र या दोन्ही ग्रहांचे एकमेकांजवळ दर्शन होईल. त्या दिवशी संध्याकाळी 7.10 वा. सूर्यास्त होईल.शुक्र खूपच तेजस्वी असल्यामुळे सुर्यास्तानंतर 5—10 मिनिटांतच दिसू लागेल. त्यानंतर 7.35 चे सुमारास संधिप्रकाशाचा प्रभाव कमी होईल आणि मग शुक्राच्या डाव्या हातास
(दक्षिणेस ) सुमारे एक अंशावर बुध ग्रह
व्यवस्थित दिसेल. या दोन ग्रहांची युती मृग नक्षत्रात होत आहे.मृगातील काक्षी
(Betalguse ) हा लाल तारा, सारथी तारका पुंजातील अग्नी (Elnath) व रोहिणी (Aldeberan) यांच्या त्रिकोणात शुक्र आणि बुधाचा मुक्काम असेल.
विस्मृतीतील कलांची ओढ !
मोकळा वेळ ही पर्वणी वाटलीये मुलांना. शाळा, होमवर्क, ट्यूशन क्लास यांनी गच्च झालेल्या दिवसांत मुलांना छंद जोपासायला वेळच मिळत नाही. भरतकाम, शिवणकाम, बागकाम या कला तर फार मागे पडतात. करोनाच्या सुट्टीत काही मुले या विस्मृतीतील कलांकडे वळली. ‘वयम्’ मासिकातर्फे आम्ही हाती घेतलेल्या अनुभव-लेखन उपक्रमामुळे ही मुले लिहिती झाली. निवडक अनुभव-लेख आम्ही संपादित रूपात प्रसिद्ध करत आहोत.
आज वाचा भाग- 10.
‘वयम’ वाचकांनो, पहाटे उठून जरा आकाशात बघा. गुरु, शनी व मंगळ सध्या आपल्याला सहजपणे दर्शन देत आहेत. पहाटे 5 चे सुमारास एकाच वेळी आकाशात तीन ग्रहांचे सुंदर दर्शन होते आहे. त्यासाठी द्विनेत्री, दुर्बिण अशा कोणत्याही साधनाची जरुरी नाही. आपले डोळे त्यासाठी समर्थ आहेत. आता हे ग्रह कसे पहायचे ते सांगतो. पहाटे 5 ते 5.30 ही वेळ सर्वात उत्तम. दक्षीणेकडे तोंड करा. तुमच्या उजव्या हाताकडून डाव्या हाताकडे (पश्चिमेक्डून पूर्वेकडे ) क्रमाने गुरु, शनी व मंगळ यांचे दर्शन होईल. गुरु या तिघांमध्ये तेजस्वी आहे. गुरु—शनी एकाच नजरेत येतात. या दोघांपासून मंगळ डाव्या हातास (पूर्वेकडे) थोडा दूर आहे. मंगळवाऱ दि. 12 ते शनिवार दि.16 पर्यंत निरीक्षण केल्यास आकाश दर्शनाबरोबरच चंद्राचे सरकणेही लक्षात येईल. या काळात ग्रहांच्या स्थितीत लक्षात येण्यासारखा कोणताच बदल होणार नाही. मंगळवाऱ दि. 12 च्या पहाटे चंद्राजवळ गुरु व शनी सहज ओळखता येतील. बुधवार दि. 13 रोजी चंद्र शनीच्या जवळ पोहोचलेला असेल. गुरुवार दि.15 रोजी चंद्र मंगळाला भेटेल. शुक्रवार दि. १६ रोजी चंद्राच्या रेषेत उजवीकडे (पश्चिमेस) अनुक्रमे मंगळ, शनी आणि गुरु यांचे सुरम्य दर्शन होईल.
घरच्या घरी, कित्तीतरी! ‘वयम्’ मासिकातर्फे आम्ही हाती घेतलेल्या अनुभव-लेखन उपक्रमातील भाग 9 मध्ये मुलांच्या वेगवेगळ्या उपक्रमांबद्दल वाचा. वाचताय ना तुम्ही ही मालिका? आज वाचा भाग- 9.
घरच्या घरी, कित्तीतरी! घरी असतानाही खूप काही शिकता येतं, याचे धडे या काळाने मुलांना दिले. मुलांनी घराची प्रयोगशाळा केली आणि पापड, केकपासून सॅनिटायझरपर्यंत काय काय करून पाहिलं. ‘वयम्’ मासिकातर्फे आम्ही हाती घेतलेल्या अनुभव-लेखन उपक्रमातील भाग 8 मध्ये मुलांच्या मनमुराद प्रयोगांबद्दल वाचा. वाचताय ना तुम्ही ही मालिका?
मदत घेण्याची कला!
अचानक भरपूर वेळ मिळाल्यावर तो कारणी लावण्यासाठी कोणाची मदत घ्यायची हे, ही मुलं न शिकवता शिकली. आपले शिक्षक, आजी-आजोबा, दादा-ताई, शिबिर किंवा क्लब चालवणारी त्यांच्या जिव्हाळ्याची व्यक्ती आणि आधुनिक तंत्रज्ञान यांचा हात धरून त्यांनी नवं काहीतरी करून पाहिलं.
‘वयम्’ मासिकातर्फे आम्ही हाती घेतलेल्या अनुभव-लेखन उपक्रमाला भरघोस प्रतिसाद मिळत आहे. निवडक अनुभव-लेख आम्ही संपादित रूपात प्रसिद्ध करत आहोत. वाचताय ना तुम्ही ही मालिका?
मुलं वाचत नाहीत.. त्यांना अभ्यास नकोसा वाटतो... ही गृहितकं चुकीची आहेत. निदान ‘वयम्’ मासिकाशी निगडित असलेली मुलं तरी छान वाचतात, स्वतः स्वतःला हवं ते आवडीने शिकतायत. त्यासाठी मनापासून अभ्यास करतात. संधी, वेळ आणि वाव मिळताच ही मुलं किती काय काय करताहेत, बघा! ‘वयम्’ मासिकातर्फे आम्ही हाती घेतलेल्या अनुभव-लेखन उपक्रमाला भरघोस प्रतिसाद मिळत आहे. निवडक अनुभव-लेख आम्ही संपादित रूपात प्रसिद्ध करत आहोत. वाचताय ना तुम्ही ही मालिका?
मुलांना एरव्ही मोकळा वेळ मिळणे दुर्मीळ झाले आहे. शांत, निवांत वेळ मिळताच ही मुले किती वेगवेगळ्या गोष्टी करून पाहतात, बघा. वयम् वाचक मुलांच्या अनुभव-लेख मालिकेचा हा 5वा भाग!
वयम्’ मासिकातर्फे आम्ही केलेल्या आवाहनाला भरघोस प्रतिसाद मिळत आहे. रोज किमान २०-२२ ‘वयम्’ वाचक-मुलांचे अनुभव-लेख आमच्यापर्यंत येत आहे. या अनुभव-लेखांतून मुले त्यांच्या भावना व्यक्त करत आहेत. मुले नवनवीन गोष्टी करत आहेत. नवीन काही समजून घेत आहेत. निवडक अनुभव-लेख आम्ही संपादित रूपात प्रसिद्ध करत आहोत. वाचताय ना, ही अनुभव-मालिका?
वयम्’ मासिकातर्फे आम्ही केलेल्या आवाहनाला भरघोस प्रतिसाद मिळत आहे. रोज किमान २०-२२ ‘वयम्’ वाचक-मुलांचे अनुभव-लेख आमच्यापर्यंत येत आहे. या अनुभव-लेखांतून मुले त्यांच्या भावना व्यक्त करत आहेत. मुले नवनवीन गोष्टी करत आहेत. नवीन काही समजून घेत आहेत. निवडक अनुभव-लेख आम्ही संपादित रूपात प्रसिद्ध करत आहोत. वाचताय ना, तुम्ही ही अनुभव-मालिका?
करोना विषाणूमुळे घरातच वेळ घालवत असताना आपण किती वेगवेगळे अनुभव घेऊ शकतो, हे मुलांकडून समजून घेण्यासारखे आहे. रोजच्या रोज ‘वयम्’च्या वाचक-मुलांचे अनुभव-लेख आमच्यापर्यंत येत आहेत. सिंधुदुर्ग ते गडचिरोली अशा महाराष्ट्र राज्याच्या पूर्व-पश्चिम सीमाभागांतूनही मुलांचे अनुभव-लेख आले आहेत. या संभ्रम-काळाबद्दल वाटणारी हुरहूर, चिंता आपल्या लेखनातून ही मुलं प्रकट करत आहेत. रडत, कंटाळत न राहता त्यांनी ही परिस्थिती फार समजूतदारपणे स्वीकारली आहे. त्यांचे अनुभव, नव्या जाणिवा त्यांच्याच शब्दांत, पण थोडक्यात समोर ठेवणारी ही अनुभव-मालिका.. वाचताय ना?
घरोघरीची मुले सध्या घरी आहेत. यंदा करोना विषाणूमुळे अचानक मिळालेली सुट्टी शिवाय सर्व कुटुंबीयही घरी, अशा या काळात मुलांनी काय नवे अनुभव घेतले, त्यांना कोणत्या नव्या जाणिवा झाल्या, हे जाणून घेण्यासाठी ‘वयम्’ मासिकातर्फे करण्यात आलेल्या आवाहनाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. रोजच्या रोज ‘वयम्’ वाचक-मुलांचे अनुभव-लेख वाचायला मिळत आहे. त्यात संभ्रम-काळाबद्दल मुलांच्या मनात निर्माण झालेल्या विविध भावना त्यांनी व्यक्त केल्या आहेत. त्यात हुरहूर, काळजी, चिंता अशा भावना स्वाभाविकपणे प्रकट झाल्या असल्या तरी बहुतांश मुलांनी ही परिस्थिती फार समजूतदारपणे स्वीकारली आहे.
इंट्रो - मानवी डोळ्यांना रंग नेमके कसे ओळखता येतात, यावर आतापर्यंत बरीच संशोधने झाली आहेत. काही संशोधने चालू आहेत. त्या संशोधनांतून कितीतरी रंगतदार शोध लागले आहेत... आपल्या जीवनात रंगच नसते, सगळं काही काळं-पांढरं असतं तर किती कंटाळवाणं झालं असतं, नाही का ! नशीब, आपल्या सभोवतालीच निसर्गानेच किती रंगांची लयलूट केली आहे. सरत्या पावसाच्या संध्याकाळी आभाळात दिसणारी इंद्रधनूची कमान त्यावरील ता ना पि हि नि पा जा किंवा VIBGYOR आपण आनंदाने पाहू शकतो कारण आपले डोळे आणि त्यांना आज्ञा देणारा मेंदू !
रंग कोणाला नाही आवडत ? होळी, दहीहंडी अशा सणांवेळी आपण मोठ्या प्रमाणात रंगांशी खेळतो. पण हे रंग बनतात कसे? काही वेळा हे रंग अपायही करतात. मग कोणते रंग चांगले? वाचा मार्च २०१६ च्या ‘वयम्’ अंकातील उद्योगभेटीचा वृत्तान्त - रंगात रंग कोणता? म्हणजेच Colour colour which colour? हा खेळ आपण तुम्ही खेळलाय? हा खेळ खेळताना जो रंग आपल्याला शोधायला सांगितला आहे तो रंग शोधायला आपण आपल्या आजूबाजूला पळतो आणि तो रंग सापडला की त्याला हात लावून धरतो. तो रंग शोधेपर्यंत जो आउट होईल त्यावर राज्य येते. यावेळी निसर्गातील अनेक रंगाची जणू उजळणीच चाललेली असते.
सात रंगांची, तानापिहिनिपाजा भिंगरी गर्रकन फिरवली की, हा पांढरा रंग दिसतो. पण बशीत उरलेले रंगांचे उगाळे एकत्र केल्यावर मात्र काळाकुट्ट रंग होतो. असे का? आपल्याला रंग कसे दिसतात?.. वाचा हा लेख - “आई, असं का होतंय?” नीलने आईला ओढतच बाल्कनीत नेलं. “इथे बघ! आम्ही ही सात रंगांची, तानापिहिनिपाजा भिंगरी बनवली. ती रंगवताना आम्ही बशीत त्या साती रंगांचे वेगवेगळे ठिपके घोटवले होते. आता ही भिंगरी गर्रकन फिरली की, हा असा मस्त पांढरा रंग दिसतो. पण बशीत उरलेले रंगांचे उगाळे एकत्र केल्यावर मात्र हा बघ असा काळाकुट्ट रंग झाला.” “असं का झालं, काकू?” नीलच्या मित्राला, अर्णवलाही, हाच प्रश्न पडला होता.
शब्दांनाही नाती असतात. ती समजून घेण्यात मजा असते. या लेखात ‘होळी’ आणि ‘अग्नी’ या शब्दांची नातीगोती जाणून घेऊया. `होळी रे होळी पुरणाची पोळी’, `आयी होली आयी, सब रंग लायी’ या अशा ओळी वाचून गेल्या वर्षी साजऱ्या केलेल्या होळी या सणाच्या कितीतरी आठवणी मनात जाग्या झाल्या असतील ना तुमच्या ? आणि आता तुम्हाला होळी पेटल्यावर तडतडतडतड वाजत आसमंताला भिडणाऱ्या आगीच्या ज्वाळा, होळीच्या गरम गरम हाळा, होळीत टाकलेल्या नारळाच्या खमंग भाजक्या खुरड्या मस्त स्वादिष्ट पुरणपोळी तुमच्या बरोबरीने काकामामांनी ठोकलेल्या आरोळ्या आणि मारलेल्या बोंबा आणि दुसऱ्या दिवशी होळीच्या रंगांनी रंगवलेली बाळगोपाळ दोस्त मंडळी.
इंट्रो - प्राण्या-पक्ष्यांचे रंग किती वेगवेगळे असतात ना? रोहित पक्षी (फ्लेमिंगो) छान गुलाबी का? मोराचा मूळ रंग म्हणे तपकिरी असतो पण आपल्याला तर तो मोरपिशी दिसतो... असे का?
प्राण्या तुझा रंग कसा ? आणि प्राण्या तो असा का ? या प्रश्नाची उत्तरे आपल्याला शोधताना या पृथ्वीवर असणाऱ्या विविध सजीवसृष्टीत निसर्गाने किती विचारपूर्वक रंगांची उधळण केली आहे, ते लक्षात येते. प्राण्यांच्या अंगावर दिसणारे रंग हे त्यांच्या कातडीत, केसात, लवेमध्ये किंवा पिसांत असणाऱ्या रंगद्रव्यामुळे दिसतात.
इंट्रो- आपण रंग कसे काय ओळखू शकतो? आपल्या शरीरात अशी कोणती यंत्रणा आहे, जी आपल्याला रंग ओळखायला मदत करते? रंग ओळखणे ही काही सोपी क्रिया नाही. नीट समजून घ्या हं. या शास्त्रज्ञ काकानी आपल्याला खूप सोपं करून सांगितलय हे विज्ञान. आपल्याला रंग कसे शिकवले जातात? तर हिरवा रंग गवताचा. म्हणजे तर गवत ज्या रंगाचं असतं तो हिरवा. पण मग पोपटाचाही हिरवाच कसा, असा प्रश्न साहजिकच पडू शकतो. कारण त्या दोन रंगांमध्ये फरक असतो. तेव्हा रंगांची ओळख पटायची तर त्या रंगांचा अनुभव त्याला घ्यावा लागतो. आपल्या डोळ्यांनी तो रंग पाहिल्याशिवाय त्याची ओळख पटणं तसं कठिणच आहे.
मित्रांनो, आपल्या सार्या भारतीयांसाठी फेब्रुवारी महिना हा महत्त्वाचा आहे. याचं कारण याच महिन्याच्या २८ तारखेला 'राष्ट्रीय विज्ञान दिन' देशभर साजरा करण्यात येतो. दरवर्षी त्या दिवशीचं म्हणून एक घोषवाक्य जाहीर केलं जातं आणि त्या दिवशी देशभर होणारे कार्यक्रम त्या घोषवाक्याच्या अनुषंगानं केले जातात. या कार्यक्रमांमध्ये शाळा, महाविद्यालयं, विद्यापीठं, विविध संशोधन संस्था यांच्यातील विद्यार्थी, त्यांचे शिक्षक, शास्त्रज्ञ, संशोधक भाग घेतात. हा दिवस साजरा करायला सुरुवात झाली, ती १९८६ सालापासून.
ज्यांच्या नावाचा एक तारा अथांग तारांगणात अक्षय विराजमान आहे असं एक
आदरणीय नाव - कविश्रेष्ठ कुसुमाग्रज. अर्थात –‘ज्ञानपीठ’ पुरस्कार प्राप्त विष्णू
वामन शिरवाडकर. जनमानसातले तात्यासाहेब!
कवी, साहित्यिक अनेक असतात; पण ज्यांचे शब्द समाजाला जगण्याची प्रेरणा
देतात; काळोखात ठेच लागल्यानंतर फुंकर घालतात व पुढील वाटचालीसाठी प्रकाश
देतात, असे साहित्यिक विरळा असतात. आपले वि.वा.शिरवाडकर म्हणजेच
कविश्रेष्ठ कुसुमाग्रज हे त्यांपैकीच महत्त्वाचे शब्दप्रभू.